वाट

रोज याच खिडकितुन बघतो वाट येण्याची
रंगवतो मी स्वप्न पुन्हा घरी जाण्याची
वाटलं नव्हतं माझ्या वरती असे दिवस येतिल
माझिच मुलं मला व्रुधाश्रमात नेतिल
ज्यांना जपलं फूला सारखं हाती काटे रुतवून
टाकुन गेलेत मलाच माझे सारे काही विसरुन
अस्ती ही जर सोबत तर वाट्ले नस्ते खरं
येवढे जड झालोत आपण सोडुन गेलित पोर
हीचा फोटो येतांना मी आठवणीनी आणला
तसा पण तो अडगळीच्या खोलित होता टांगला
किती दिवस गेलेत आता तेही आठवत नाही
फोटो सोबत बोलत बसतो काम नाही काही
आता फक्त म्रुत्युची त्या बघायची वाट
गेल्यावर मी या मुलांनो सरणा द्याया आग

No comments: